Posts

माझ्या विझण्याचा सोहळा

इथल्या चांदण्यांनाही होता माझ्या हसण्याचा लळा रात्र होण्याआधी संपवा माझ्या विझण्याचा सोहळा पाठ फिरवून जगाकडे मी घ्यायला निघालो समाधी कित्येक सरसावले पुढे मागून कापण्या गळा सावलीत पहुडल्या आश्रिताला काय सांगू माझी व्यथा मातीत रुजण्याचे शाप अन सूर्य सोसण्याच्या झळा माझ्या बदनामीचे का आहे येथे वावडे कुणाला? कोणी करावीच बातमी तर काय लिहावा मथळा? जगण्याच्या इच्छेविरुद्ध मी भरतो जीवघेणे उसासे मी निमंत्रले आहे मरण श्वास करण्या मोकळा - कौस्तुभ

कोपरा

निबिडाचा पत्ता विचारीत तुझ्या घराची कोणी दाखवावी दिशा तेव्हा तू व्यापून बसावंस आभाळ आणि माझ्यासाठी नसावा तिथे एकही कोपरा ह्या दरवेळच्या निरर्थकतेला झाटावर मारुन आपण चालत जावं विरुद्ध दिशांनी आणि गॅलिलिओने द्यावे संदर्भ पृथ्वीला गोल(च) असण्याच्या शापाचे

खिडकी-1

खिडकीत रुतल्या गजांशी हि सलगी संपत नाही ना सांज विरत जाते ना वारा कंपत नाही तुळशीची रोपे आता भासतात जीवघेणी तू खुडून न्यावीस पाने डोळ्यांत दाटवून पाणी हे आभाळाचे ओझे कोणाशी रिते करावे? वक्षांत अडकल्या तुझिया कुठल्या रात्रीला स्मरावे?

रह गये

हम रदीफ़ बदलते रह गये वो मिसरे बदलते रह गये क्या पूछे मरीजों का हाल जब वो हकीम बदलते रह गए हमने भेजना चाहा खत उन्हें वो पता बदलते रह गये हम बैठे ज़माने के पाबंद वो ज़माना बदलते रह गये अभी तो जानने लगे थे उन्हें वो पहचान बदलते रह गये हम रोजे तोड़ ना सके वो चाँद बदलते रह गये

बौद्धिक षंढत्व

मी देऊ शकत नाही नवा विचार ना शक्यता निर्माण करू शकतो क्रांतीची मी लिहू शकतो फक्त आत्ममग्न स्वगतं मला जमते फक्त माझे रडगाणे आभाळाएवढे करणे मी गाठू शकतो केवळ निरर्थकतेचेच तळ आशावादाचे कर्ज डोक्यावर घेऊन फिरणे आता परवडत नाही मी नाही लिहू शकत नवी कविता कारण जमत नाही आता झटकून देणे कुजलेल्या सौंदर्यशात्राचे ओझे मी जाणीव करु शकत नाही समृद्ध फक्त प्रसवू शकतो भूल स्थळकाळाचे भान ठेवून मी आता पत्करलेय बौद्धिक षंढत्व आणि करत सुटलोय जयजयकार कशाचही....

कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

कैक दिवसांनी मला एकाच प्रश्नाने घेरलं कटप्पाने बाहुबलीला का म्हणून मारलं? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आहे प्रश्नाची उकल झालीच पाहिजे कटप्पाने असं का केलं हे कळलंच पाहिजे इतर प्रश्न तर रोज़च असतात पण हे प्रकरण आहे खास कटप्पाची इंटेन्ट कळेपर्यंत सोडायचा नाही ध्यास एरव्ही कोणी मारले कुणाला आपल्याला काय घेणं पण बाहुबलीच्या बापाचं लागतो आपण देणं म्हणून काळजी रास्त आहे पर्सनल स्टेक जास्त आहे देशभरात लोक सगळे एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत काय झालं असेल त्यांच्यात असं कसं घडलं? कळलं का हो तुम्हाला, कटप्पाने बाहुबलीला का मारलं? थ्रीडी व्हीआर व्हीएफएक्स हेच खरं आहे बाहेरच्या बोरिंग रियॅलिटीपेक्षा तेच बरं आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करुदेत अखलाक, पेहलू खान मरताहेत, मरुदेत त्यांचे खून पाडले म्हणून आपण रडायचं नाही बाहुबलीच्या खुनाचं कुतूहल आपण सोडायचं नाही कुठल्या कटप्पाने आपल्यातल्या संवेदनशीलतेला मारलं आपल्यातला माणुसकीला आपण कुठे नेऊन पुरलं? ते जाऊद्यात मला सांगा कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

कश्मीर २

दिमाखात फडकत राहील एक तिरंगी षडयंत्र आपण मुठी आवळत आकाशाकडे बघत छाती 56 इंच फुगविण्यासाठी जेव्हा मोठ्ठा श्वास घेऊ उत्तरेकडच्या नंदनवनातून मुडदयांची दुर्गंधी येईल आपण गुदमरायचं नाही राष्ट्रवादाचे सुस्कारे सोडायचे फक्त....