Monday, December 31, 2007

वर्ष सरलं तरी!




वर्ष सरलं तरी,
जखमा भरल्या नाहीत
नव्या जखमांना शरिरावर
जागाही उरली नाही
अश्रू आटून गेले
आता भावनाही संपल्या
तरीही का ह्या वेदना
मनात आहे गुंफ़ल्या?
व्यवहारी झालोय मी आता
व्यवहारी जीवन जगतोय
मनातल्या आठवणींचा कप्पा
क्वचितच उघडून बघतोय
का ह बदल माझ्यात?
क बदललंय सगळच वातावरण
धुमसत का राहतं अजूनही
पेटलेल्या मनाचं सरण
नवी पहाट दूर करेल हा काळोख?
का वाढत जाईल हा काळोख?
नाही!
प्रकाशाच्या शक्तिने काळोखी भींतीला
पडेल एक खिंडार...
कोंडलेल्या श्वासाला मिळावे
आता सुस्कारे आकाशाचे
मनाला लाभावे नवचैतन्य
सळसळण~या रक्ताचे
सतारीवर छेडावे आता
स्वर नव्या भूपाळीचे
चिकारीही झंकारत याव्या
घेऊन स्वरगालिचे
विदीर्ण झालेल्या मनाला
फ़ुटावी पालवी नवी
सरत्या वर्षाने गावी
ह्या आसवांची भैरवी

4 comments:

rohan said...

hi
kaustubh
nice to see your poems
too good
have you writtten those?

Kaustubh said...

offcourse yes!!!

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

too good kaustubh!
your poems touch the heart.
Its true that the words from the heart reach every heart.