स्थळ: भरत नाट्य
मंदिर, सदाशिव पेठ
वेळ: रात्रीचे साडेनऊ
नाटक: गेली एकवीस
वर्ष
एवढ्या रात्री एका प्रायोगिक
नाटकाला होणारी गर्दी पाहून
ऒशाळलेला मी. थिएटरमध्ये
शिरताच दिसतो सताड उघडा
रंगमंच. कोपऱ्यात दोन कलाकार
बॉब डिलनची गाणी
म्हणत बसलेले आहे.
How many roads
must a man walk down
Before you call him
a man?
The answer my
friend, is blowin in the wind
खरं तर ‘blowin in the wind’ हे
गाणं ह्या नाटकाची
नांदीच आहे. तिसरी
घंटा झाल्यावर एक
तरुण रंगमंचावरुन गाणाऱ्यांना
हुसकावून लावतो आणि नाटक
सुरू होतं. गोष्ट
आहे एका तरुणाची
आणि त्याच्या गेल्या
एकवीस वर्षाच्या प्रवासाची.
स्वत:ला कुठल्याच
सामाजिक पार्श्वभूमीवर identify न करु
शकणारा हा तरुण.
इतर समवयीन तरुणांचे
जे प्रश्न ते
त्यालाही पडतात. पण इतरांसारखा
तो त्याकडे दुर्लक्ष
करत नाही तर
उत्तरं शोधण्याच्या फ़ंदात पडतो
आणि त्याचा जो
वैचारिक गोंधळ सुरु होतो,
तो गोंधळ, ती
"को अहम?" स्वरुपी प्रश्नाच्या
उत्तरांची शोधयात्रा म्हणजे हे
नाटक.
ह्या शोधयात्रेच्या एका वळणावर
तरुणला भेटतो रघू. रघू
हा केवळ रोडीजचा
जज्ज नाही तर
तरुणच्या मनातला एक आदर्श
पुरुष आहे. त्याला
सगळं कळतं असा
तरुणचा समज असतो.
अर्जुनाला पडलेले प्रश्नांची उत्तरे जशी कृष्णाने
दिली तसंच तरुणला
पडलेले प्रश्नांची उत्तरं तो
रघूकडून मिळविण्याचा प्रयत्न. पण
रघूचं उत्तर गीतेच्या
सारासारखं "जो हुआ
वो अच्छा हुआ" असं नाही तर "जो हुआ है
उसे जला दो"
असं आहे. पोर्नची
हिस्ट्री डिलीट करावी तशी
मनात साचलेली सगळी
हिस्ट्री डिलीट केल्याने हे
आतून उमटणारे प्रश्न,
ह्या वेदना थांबतील
हा रघूचा सल्ला
तरुण ऎकतो.
इतिहास
आपल्याला धर्म शिकवतो,
शोषण शिकवतो मग
त्या इतिहासाला एवढं
का जपावं? का
त्याच्या संवर्धनासाठी झगडावं? हे प्रश्न
धर्मकिर्ती सुमंतने नाटकातून मांडलेले
आहेत.
नाटकाची उत्तम
बांधणी आणि प्रेक्षकांना
वेळोवेळी सामावून घेणारे सादरीकरण
ह्या नाटकाच्या जमेच्या
बाजू आहेत. दिगदर्शक
आलोक राजवाडेने ज्या
फ़ॉर्मद्वारे हे नाटक
हाताळलंय, त्यानुसार तर नाटक
’पाथब्रेकिंग’च म्हणावं
लागेल. कुठेही क्लिष्टता नाही,
गिमिक्स नाही, अचूकपणे घेतलेल्या
जागा तर म्हणजे
लै भारीच!
नाटकातील मध्यवर्ती भूमिका अमेय
वाघने साकारली आहे.
तो कहर करतो.
त्याच्यात प्रचंड एनर्जी आहे
आणि हे वेळोवेळी
त्याने साकारलेल्या भूमिकेतून जाणवत
राहतं. सिध्दार्थ मेननने रघूची
भूमिका तितक्याच ताकदीने साकारली
आहे. ’नाटक कंपनी’च्या कुठल्याही नाटकाचा यूसपी
म्हणजे उर्जेने भरलेले कलाकार
आणि तेवढाच तगडं
सादरीकरण. ’गेली एकवीस..’
हेही नाटक त्याला
अपवाद नाही.
नाटक बघता बघता
मला माझी नुकतीच
गेलेली एकवीस वर्ष आठवली.
गोंधळून जायचो मीही गांधीवादी
मुद्द्यावर भांडताना, मित्र ’दबंग’ बघायचे तर मी
आयन रॅण्ड वाचायचो,
आणि असे अनेक प्रश्न आणि अनेक तफ़ावती! धर्मकिर्तीने
तो गोंधळ मनात
परत जिवंत केला.
मन अस्वस्थ झालं.
दडपून टाकलेले प्रश्न
परत उभे राहिले,
अनामिक भितीपोटी मारुन टाकलेल्या
इच्छा पुन्हा जाग्या
झाल्या. खूप विचित्र
आणि अस्वस्थ वाटतंय.
कळ येणं म्हणजे
नक्की हेच का?